सायबर सुरक्षेचा जागर; डिजिटल व्यवहारात सावधगिरीचा संदेश जळगाव
1 min read
सायबर सुरक्षेचा जागर; डिजिटल व्यवहारात सावधगिरीचा संदेश
जळगाव : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, जळगाव येथे जनजागृती उपक्रम पार पडला.
सोमनाथ वडनेर यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात मीनाक्षी दीदी उपस्थित होत्या.
Sakshi Patil, Vidya Sonawane, Akshay Patil आणि Lokesh Patil यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, OTP, Phishing, Social Media Security, Digital Footprint आणि संशयास्पद डिजिटल व्यवहारांपासून सुरक्षित राहण्याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान काही नागरिकांनी त्यांच्यासोबत घडलेल्या सायबर फसवणुकीच्या घटना आणि आलेल्या डिजिटल समस्यांबाबत प्रश्न विचारले. Cyber Warriors यांनी त्यांच्या प्रश्नांना समजून घेत योग्य मार्गदर्शन केले, शंकांचे निरसन केले आणि संबंधित समस्यांवर सुरक्षित पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली.
सायबर सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, डिजिटल सुविधा वापरताना सतर्क राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
